परशुरामांचे बालपण , शिक्षण आणि विविध अस्त्र – शस्त्रांची प्राप्ती – माधव घुले – एप्रिल २०१५ ते जून २०१५

भगवान श्री विष्णूंनी आपण त्रेता आणि द्वापार युगांच्या संधीकाली अवतार घेवू असे आश्वासन दिले होते त्यानुसार जमदग्नी व रेणुका हे दाम्पत्य आपल्या अवतारासाठी योग्य असे ठरवून श्री विष्णूंनी आदिशक्तीचे चिंतन करून रेणुकादेवीच्या पंचम गर्भात प्रवेश केला. आणि वैशाख शुद्ध तृतीयेला आदिती नक्षत्रावर परमज्योतिस्वरूप बालकाने रेणुकादेवीच्या उदरी जन्म घेतला. त्रिभुवन सर्वार्थाने प्रकाशित झाले. आश्रमातील वातावरण भारावून …

अधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वाधिक प्रगत जीव कोणता याचे साधे उत्तर मानव हे होय यामध्ये दुमत असू नये. मग असं असताना जगननियात्याचे हे वरदान ओळखून त्याचे ऋण व्यक्त करणे आणि सकल प्राणिमात्रांमध्ये सलोखा राहिल याची जबाबदारी स्वत:हून पत्करणे हे त्याचे परम कर्तव्य ठरते. किंबुहना अशा प्रत्येक व्यक्तीमात्रेने ही परंपरा पाळली जाईल असे कटाक्षाने पाहणे हाही त्याच कर्तव्याचा …

सावध ऐका, पुढल्या हांका…

सावध ऐका, पुढल्या हांका……………… शिक्षण म्हणजे नेमकं काय? पदव्या सगळेच मिळवतात. कोणि शिक्षणसम्राट तर कोणि शिक्षणमहर्षि बनून शिक्षणाचे कारखाने काढतात. बालवाडी असो वा पी. एच. डी. क्लासचा धंदा तर सुगीचा झालाय. बी एड्च्या फॅक्टरीज निघाल्याने शिक्षक हा गुरु न राहता, संस्थाचालकांचा निव्वळ पोटार्थी नोकर झालाय. पदवीसाठी मोजलेल्या दिडक्या दामदुपटीने वसूल करणारा एक सर्वसामान्य ‘ टिचर’! …

पण लक्षात कोण घेतो? – जानेवारी ते मार्च २०१०

पण लक्षात कोण घेतो? सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ या शीर्षकाची एका ज्वलंत विषयावरची कादंबरी त्या काळात खूपच गाजली होती. समाजाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरं जाऊन, त्याची उकल करून, दिशादर्शन करणं ही विचारवंतांची भूमिका वेळोवेळी समाजासमोर मांडणारे काही साहित्यिक त्या काळात होऊन गेले. लोकशाही स्वीकारलेल्या आजच्या अप्रगत, प्रतातीशील …

पुरुषप्रयत्न, दैव व नियती – जानेवारी ते मार्च २०१०

पुरुषप्रयत्न, दैव व नियती ‘योगवासिष्ठ’ या अनमोल ग्रंथामध्ये यासंबंधी केलेले विवेचन आपल्या सर्वांनाच अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. ते जसेच्या तसे वाचकांसमोर ठेवीत आहोत. प्रयत्न व दैव या संबंधाने पुष्कळ वादविवाद चालत असतात. कोणी प्रयत्न श्रेष्ठ म्हणतात, तर कोणी देवाला श्रेष्ठत्व देतात. योगवासिष्ठात यासंबंधी फार विस्तृत विवेचन आले आहे. न किंचन महाबुद्धे तदस्तीह जगत्राये | …

संपादकीय – ऑक्टोबर ते डिसेम्बर २००९

संपादकीय अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतर झाकोनि असावे प्रकटोनि नासावे, बरे नव्हें || समर्थ श्री रामदास स्वामी महाराष्ट्राची संत परंपरा थोर आहे. संतांच्या शिकवणीने जीवन जगणे सुसह्य होते. सद् विचार आणि सदाचारामुळे मनुष्यजन्म सार्थकी लागतो. सुमारे सातव्या शतकापासून या हिंदुराष्ट्राचे वारंवार लचके तोडणा-या तत्कालीन शत्रुमुळे प्रजा पिडीत झाली होती, पार पिचून गेली होती. गांजलेली मनं आणि रिकामी …

संपादकीय – जुलै ते सप्टेंबर २००९

संपादकीय ब्राम्हण बांधावा जागा हो! नकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो, नकाशातील इमारतीत राहता येत नसतं, एवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं, वास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू ज्याची त्यानं उभारून घ्यायची असते. आपण सारे ब्राम्हण आहोत. होय! ज्याकुळामध्ये आम्हाला जन्म मिळाला, योग्य संस्कार झाले त्याव्यावास्तेचे आम्ही ऋणी आहोत. त्या थोर ऋषीवरांची परंपरा आम्ही अभिमानाने सांगतो …

संपादकीय – सत् – असत्

संपादकीय सत्-असत् विचार, शोध व बोध यामुळे माणूस समृद्ध होत असतो. सततच्या आत्मचिंतनाने तो प्रगल्भ होत जातो. ज्ञान संचयाचा भार न वाटता तो अधिक विनम्र होत जातो. विवेकाच्या प्रक्रियेमधे तो नकळत शिरतो. योग्य-अयोग्य, भलं-बुरं, हित-अहित याची जाणिव याच माध्यमातून त्याला होऊ लागते. त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो. मीपणाच्या नुसत्या भावनेपासुनही तो शतयोजने दूर राहतो. सर्वसामान्यपणे माणूस …

संपादकीय – जानेवारी ते मार्च २००९

संपादकीय….. ज्ञानाग्नीने अशी जयाची कर्मे जाळून जाती सुजाण नर ते त्या पुरुषा ते ‘पंडित’ऐसे म्हणती|| स्वामी स्वरूपानंद परम पूजनीय स्वामींची ‘भावार्थ गीता’ ‘रोज एकतरी ओवी अनुभवावी’ या तोडीची आहे. सुबोध मराठी भाषेमध्ये स्वामींनी ती अधिकच देखणी करून मांडली आहे. उपरोक्त ओवितीलच नव्हे तर संपूर्ण पुस्तिकेतील शब्दरचना इतकी अचूक आहे कि ‘यापरते दुसरे नाही’ असेच म्हणावेसे …

आम्ही अंतर्मुख होणार का?

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ हे वचन सर्वश्रुत आहे. मुळातच एकुणात प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार करताना त्याची व्याप्ती वाढवत तो समष्टिपर्यंत नेण्याचा संस्कार पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबातून होत आला आहे. हा विचारच आपलं जीवन घडवत असतो. संत म्हणजे कुणि बाहेरची व्यक्ती नव्हे. स्वतःमध्ये नीट डोकावून पाहिलं तर ही गुणवैशिष्ट्ये आपल्यातही असू शकतात आणि एवढी दृष्टी आली तरी खूप …